यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.
– विनोबा भावे
विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.
– विनोबा भावे
विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
– विनोबा भावे
सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते.
– विनोबा भावे
ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.
– विनोबा भावे
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.
– विनोबा भावे
जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.
– विनोबा भावे
दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
– विनोबा भावे
परीश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.
– विनोबा भावे
प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.
– विनोबा भावे
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे.
– विनोबा भावे
माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा.
– विनोबा भावे
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.